शेतकरी मित्रांनो राज्यात अनेक शेतकरी बांधवांना पिक विमा योजनेअंतर्गत त्यांच्या पिकांचा pik vima काढून सुद्धा पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मार्फत वेळोवेळी आंदोलने तसेच शासनाकडे तक्रारी तसेच कृषी विभागाकडे मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे आता पिक विमा कंपनीने जिल्हा निहाय पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. आपल्याकडे पिक विमा जमा होण्याची नवीन अपडेट प्राप्त झालेली आहे, या Pik Vima 2023 Update Maharashtra संदर्भात माहिती आपण जाणून घेणार आहोत
मित्रांनो राज्यात अनेक शेतकऱ्यांनी खरिपाचा pik vima काढलेला आहे. राज्यात खरीप हंगामामध्ये जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक नष्ट झालेले आहेत. त्याच अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचा पीक विमा काढलेला होता ते या योजने pik vima yojana अंतर्गत पिक विमा मिळवण्यास पात्र ठरतात. त्यामुळे शासनाने तसेच पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची दावे दाखल करण्याची कळवले होते.
अतिवृष्टी नुकसान भरपाई या जिल्ह्यांची नवीन लाभार्थी यादी आज जाहीर; लगेच नाव पहा
अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांच्या झालेले नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने क्लेम केलेले होते. शेतकऱ्यांनी केलेल्या पिक विम्याच्या नुकसान भरपाई च्या क्लेम ची पडताळणी सुद्धा पिक विमा कंपन्या मार्फत करण्यात आलेली आहे. तसेच राज्य शासनाने सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतात झालेल्या नुकसानीचे पंचनामे केलेली आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा पिक विमा जमा होत आहे Pik Vima 2023 Vitarit
मित्रांनो राज्यातील यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेले होते. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईची दावे दाखल केले होते. त्यामुळे पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना पिक विम्याचा पहिला हप्ता यापूर्वीच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेला आहे. परंतु काही शेतकऱ्यांनी पीक विम्याचा दावा दाखल केलेला असताना सुद्धा त्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झालेली नव्हती. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यास कंपन्यांनी सुरुवात केलेली आहे.
पिक विमा फक्त याच शेतकऱ्यांना मिळत आहे:
मित्रांनो जिल्ह्यातील जे शेतकरी पिक विम्याच्या पहिल्या टप्प्यापासून वंचित होते. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजून पर्यंत कोणत्याही प्रकारचा kharip pik vima जमा झालेल्या नव्हता अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाल्यास सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पिक विमा जमा झाल्याचे एसएमएस प्राप्त होत आहेत.
Pik Vima संदर्भातील एक छोटीशी अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. तुमच्या जिल्ह्याला पिक विमा मिळाला का? हे कमेंट करून नक्की कळवा.