मित्रांनो गेल्या वर्षी या तुलनेत यावर्षी कापसाची पेरणी क्षेत्र वाढलेले आहे. परंतु राज्यात झालेल्या मोठ्या प्रमाणातील अतिवृष्टी तसेच पूर्व परिस्थितीमुळे अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कापूस पिके नष्ट झाल्यामुळे यावर्षी होणाऱ्या एकूण कापूस उत्पादनात त 35 ते 40 टक्क्यांची घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. CIA यांनी वर्षीच्या एकूण कापूस उत्पादनात घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. परंतु असे असून सुद्धा अजून पर्यंत कापसाच्या Cotton Market Rate मध्ये फारशी वाढ होताना दिसत नाही.
मित्रांनो गेल्या वर्षी कापसाची पेरणी क्षेत्र कमी असून सुद्धा शेतकऱ्यांना चांगला कापूस झालेला होता. परंतु यावर्षी पेरणी क्षेत्र वाढलेले आहे तरीसुद्धा उत्पादनात घट दर्शवण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला चांगला भाव मिळालेला होता. गेल्या वर्षी शेवट कापूस हा 13000 पार झाला होता. परंतु यावर्षी तो आठ हजार रुपयांच्या जवळपास आहे.
यावर्षी कापसाचे उत्पादन किती?
यावर्षी संपूर्ण भारत देशात 375 लाख गाठी कापसाचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच कापसाचे उत्पादन 290 ते 300 लाख गाठींवर स्थिर होणार आहे. अजूनही अनेक शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे बाजारात अतिशय कमी प्रमाणात कापूस विक्री करण्यास शेतकरी येत आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कापसाला कमीत कमी दहा हजार रुपये इतका दर मिळत होता. परंतु यावर्षी शेतकऱ्यांना निसर्गाने साथ दिलेली नाही त्यामुळे गेल्या वर्षीच्या प्रमाणात कमी कापूस झालेला आहे तरीसुद्धा Cotton Market Price शेतकऱ्यांना साथ देत नाही आहे.
कापसाच्या पेरणी क्षेत्रात वाढ
मित्रांनो गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळाल्यामुळे यावर्षी सुद्धा चांगला भाव मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी इतर पीक न टाकता कापूस हे पीक पेरणी केले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा लाख हेक्टर क्षेत्र हे जास्त प्रमाणात पेरणी झालेले आहे. गेल्या वर्षीपेक्षा दहा लाख हेक्टर जास्त कापूस पिकांची पेरणी झालेली आहे.
या बजारसमितीत आज कापसाला मिळाला प्रचंड बाजारभाव; इथे क्लिक करून जाणून घ्या, किती मिळाला दर
प्रतिकूल परिस्थितीमुळे कापसाच्या उत्पादनात घट:
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य तसेच गुजरात तसेच आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पूर परिस्थिती यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. यावर्षी कापसाचे पेरणी क्षेत्र वाढलेले असताना सुद्धा नैसर्गिक कोपामुळे कापसाचे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट दिसून येणार आहे.
कापसाचे भाव पुन्हा 12000 वर जाणार! इथे क्लिक करुन जाणून घ्या
कापसाचे भाव वाढणार?
कापसाचे भाव वाढणार का? हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातून निर्माण होत आहे. गेल्या वर्षीच्या तुरनेत फार कमी लोकांनी त्यांचा कापूस विकलेला आहे. गेल्या वर्षी सुरुवातीला अतिशय कमी भाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकला होता परंतु काही कालावधीनंतर कापसाचे भाव बारा हजार पेक्षा जास्त झालेले होते, बऱ्याच शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी 13 हजार रुपये पर्यंत सुद्धा भाव मिळवलेला आहे. परंतु यावर्षी कापूस सध्या आठ हजार या दरम्यान आहे. परंतु कापसाचे भाव वाढण्याचा अंदाज हा तज्ञांच्या मार्फत वर्तवण्यात येत आहे. तज्ञांच्या मते कापसाला नऊ हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळण्याची शक्यता असली तरी सुद्धा येणाऱ्या काळात लवकरच हे चित्र स्पष्ट होणार आहे.